Monday, July 28, 2008

Saahitya Melaavaa In San Francisco ....?

संमेलन की मेळावा?
28 Jul 2008, 0008 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा






विश्व साहित्य संमेलन होणारच अशी स्पष्ट चिन्हे दिसत असतानाच रत्नागिरी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य शारदा संमेलन भरवण्याचा झालेला निर्णय हा साहित्यवर्तुळामध्ये वावरणा-यांचा विवेक जागा असल्याचीच ग्वाही देणारा आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम प्रतिभावंत कवी मंगेश पाडगावकर यांची निवड करण्यात आली आहे आणि ती अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल आम्ही शारदा संमलेनाच्या आयोजकांचे अभिनंदन करतो. याचे कारण असे की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या होणा-या निवडणुकीमध्ये पडायचे नाही, असे काही ज्येष्ठ प्रतिभावंतांनी नक्की केले आहे. त्यामुळेच श्री. ना. पेंडसे आणि विजय तेंडुलकर यांना हा मान त्यांच्या हयातीत मिळाला नाही आणि विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांनाही तो देण्याचे कोणी आजवर मनावर घेतले नाही. शारदा संमेलनाच्या आयोजकांनी मात्र ही उणीव भरून काढली आहे. पाडगांवकरांची निवड करून आपण संमेलनच भरवणार नाही, तर ते अर्थपूर्णही करणार, असेच जणू त्यांनी सूचित केले आहे. रत्नागिरीतील संयोजक असा विवेक दाखवत असतानाच अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांना मात्र विवेक सोडून गेला असावा. याचे कारण काहीही करून सॅन होजे येथे संमेलन घ्यायचेच अशा निर्धारानेच ते वागत आणि बोलत आहेत.

ज्या रीतीने त्यांनी बे एरियाच्या मंडळाला संलग्नता दिली आणि टीका होताच ती रद्द करून आता तिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाऐवजी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवण्याचे ठरविले, त्यावरून विवेकहिन माणसासारखीच महामंडळाची स्थिती झाल्याचे दिसते. या सगळ्या गोंधळामध्ये यंदा अधिकृत असे अ. भा. मराठी साहित्य संमेलन इथे होणारच नाही, असे चित्र आता तयार झाले आहे आणि ते कोणाही साहित्यप्रेमीच्या जिव्हारी लागणारे आहे. मराठी साहित्य संमेलनाला एक प्रदीर्घ अशी अभिमानास्पद परंपरा आहे. एकेकाळी मराठी साहित्य व्यवहारातील लेखक-कवींनी, प्रकाशकांनी-वाचकांनी, साहित्याच्या अभ्यासकांनी-जाणकार समीक्षकांनी एकत्र येऊन जाहीरपणे विचारविनिमय करण्याचे ठिकाण असे या संमेलनाचे रूप होते. त्या वेळी अध्यक्षीय भाषणे कसदार आणि विचारपरीप्लुत असत आणि धनदांडग्यांच्या किंवा राजकारण्यांच्या आशीर्वादाची फारशी गरज तेव्हा भासत नसे. काळाच्या ओघात त्यामध्ये फरक पडत गेला. आता तर ही उरलीसुरली परंपराच मोडीत काढण्याचे अचाट धाडस अखिल भारतीय साहित्य महामंडळ दाखवत आहे. या धाडसातून अमेरिकेमध्ये काही साहित्यिक एकत्र येतील. अमेरिकेतून आणि अन्य ठिकाणांहूनही काही रसिक तिथे जमतील.

मात्र ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नसेल, तर तो एक साहित्य मेळावा असेल. एक दीर्घ परंपरा मोडून आयोजित केलेल्या या मेळाव्याने काही लोकांची चारजणांना एकत्र करण्याची हौस फिटेल. काहींना साहित्यिकांना भेटल्याने कृतकृत्यही वाटेल. काहीना त्यांच्या सहवासाने स्वर्ग लाभल्याचाही भास होईल. तर काहींना, आपण आपले स्वप्न अखेरीस साकार केलेच याचा आनंद होईल. त्यांच्या आनंदामध्ये आम्ही मिठाचा खडा टाकू इच्छित नाही. मात्र या मेळाव्याला अ. भा. मराठी साहित्य संमेलन म्हणता येणार नाही. उलट असे संमेलन भरवण्याच्या परंपरेला छेद देणारी घटना अशीच या साहित्यमेळ्याची नोंद इतिहासात होईल. मराठी रसिकांच्या सामूहिक इच्छाशक्तीला धाब्यावर बसवून होणाऱ्या या मेळाव्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलनच रद्द होऊ नये, अशीच रसिकांची इच्छा आहे. तसे करणे हा मराठी सरस्वतीउपासकांचा अपमान ठरेल.





या बातमीवर तुमचं मत मांडण्यासाठी इथे क्लिक करा.

No comments: