Friday, July 25, 2008

Election Of President For Vishwa Marathi Saahitya Sammelan(Maharashtra Times)

संमेलनाध्यक्ष निवडणार २४ जण!
25 Jul 2008, 0024 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा





- संजीव उन्हाळे । औरंगाबाद

' विश्व मराठी साहित्य संमेलना'चा अध्यक्ष निवडण्याची घटनात्मक तरतूद महामंडळाकडे नसल्यामुळे यावषीर् संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार नाही.' अशी घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी गुरुवारी केली!

महामंडळाचे १९ सदस्य व संयोजन समितीचे पाच सदस्य अशा एकंदर २४ मतांचा कानोसा घेऊन संमेलनाध्यक्ष निवडला जाईल, हेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रत्नागिरीच्या संमेलनाबद्दल, 'तेथील संयोजकांनी 'नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच आम्हाला साहित्य संमेलन घेता येणे शक्य आहे', असे सांगितले होते. एकंदर विश्व साहित्य संमेलनाची मोठी तयारी करायची असल्यामुळे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये महामंडळाला अखिल भारतीय साहित्य संमेलन घेता येणे शक्य नाही. त्यामुळे हे संमेलन होणार नाही' असा युक्तिवाद ठाले-पाटील यांनी मांडला.

कोकण मराठी साहित्य परिषदेने पर्यायी महामंडळ स्थापन करण्याचे ठरवल्याबद्दल विचारले असता ठाले यांनी निराळेच उत्तर दिले! ते म्हणाले: कोमसापने आमच्याकडे 'किमान आम्हाला संलग्न संस्था म्हणून तरी मान्यता द्या' असा विनंतीअर्ज केला आहे. कोमसापला घटकसंस्था म्हणताच येत नाही. केवळ चार संस्थापक संस्थाच घटकसंस्था असल्याने, त्यांचे अधिकार कोमसापला मागताच येत नाहीत; त्यामुळे कोमसापचा तो अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे विचारार्थ पाठवण्यात आला आहे.

' रत्नागिरीत साहित्य संमेलन भरवण्याबद्दल बैठकीत काहीच चर्चा झाली नाही. अमेरिकेतल्या संमेलनाचीच चर्चा झाली. तेवढीच चर्चा व्हावी, असा प्रकार सुरू होता. दोन्ही ठिकाणी संमेलने होणार, तर चर्चाही दोन्हीची हवी, असे आमचे मत असूनदेखील आम्हाला गृहीत धरण्यात आले' असे कारण या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, उपाध्यक्ष श्रीपाद जोशी, सदस्य शोभा उबगडे यांचा यांचा समावेश बैठकीबाहेर पडणाऱ्यांत होता. मात्र, आमच्या कृतीला 'सभात्याग' वा 'बहिष्कार' समजू नये, असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

.....

No comments: