Saturday, July 12, 2008

saahitya mahamandalaavar thaakarenchi tikaa(news item from maha.times.)

कौतिकराव ठालेंना बाळासाहेबांचे टोले!
7 Jul 2008, 1248 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा





मुंबई,
मटा ऑनलाइन वृत्त

साहित्यसम्राट कौतिकराव ठाले-पाटलांनी ८२ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेसोबतच रत्नागिरीतही घेण्याची घोषणा केली आहे. पण त्यापैकी कुठल्या संमेलनावर ८२ व्या संमेलनाचा शिक्का बसणार ? अमेरिकेतल्या की रत्नागिरीतल्या ? आणि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कुणाला घोड्यावर बसवणार ?, असे खोचक विचारणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ' सामना ' मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात त्यांनी साहित्य महामंडळांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे.

' ठाले पाटलांच्या कसरती ' या शीर्षकाखालील अग्रलेखाच्या सुरुवातीलाच बाळासाहेबांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना टार्गेट केलंय. एकही पुस्तक न लिहिलेले साहित्य सम्राट, असंच त्यांनी त्यांचं वर्णन केलंय. कौतिकरावांचं अंतःकरण किती मोठं ? अमेरिकेबरोबरच सामान्य रसिकांसाठी त्यांनी रत्नागिरीत पर्यायी पण अधिकृत साहित्य संमेलन घेण्याची घोषणा केली. पण, आता प्रश्न असा निर्माण झालाय की, ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शिक्का कोणत्या संमेलनावर मारायचा ? अमेरिकेत होणारे संमेलन ८२ वं की रत्नागिरीत होणारं संमेलन ८२ वं ? असा बिनतोड सवाल शिवसेनाप्रमुखांनी केलाय. डाव्यांचा अमेरिकाविरोध लक्षात घेऊन ' उगाच पंगा नको ' म्हणूनच अमेरिकेबरोबर रत्नागिरीतही संमेलन घेण्याचं महामंडळानं ठरवलं असावं, अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे.

दोन साहित्य संमेलनं होणार, मग अध्यक्ष अमेरिकेतल्या व्यासपीठावरून भाषण ठोकणार की रत्नागिरीत येऊन त्यांच्या जबरदस्त विचारांची पिचकारी मारणार ? , असा प्रश्न करत बाळासाहेबांनी एकूण साहित्य संमेलनावरच हल्ला चढवलाय. एकाच वेळी दोन साहित्य संमेलनांना हजेरी लावण्याचा चमत्कार कसा होईल ? अशा प्रकारचा चमत्कार घडवण्याची उदी किंवा अंगारा ठाले-पाटलांकडे असेल तर त्यांना तो अध्यक्षांना पुरवावा लागेल, असं म्हणत ते पुन्हा कौतिकरावांवर घसरले आहेत.

सेनेचा केंद्रबिदू मराठीच !
बाळासाहेबांनी या अग्रलेखात मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्यांनाही स्पर्श केलाय. मराठी हाच आमच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिलाय आणि राहील. मराठी भाषेचं वैभव टिकवायचं असेल तर मराठी माणूस टिकला पाहिजे. मराठी माणूस मनाने आणि पैशानेही श्रीमंत झाला की भाषेलाही समृद्धी येईल. आज मराठी पुस्तकांची हजार-पंधराशे प्रतींची आवृत्ती संपवताना प्रकाशकांची दमछाक होते. अशावेळी साहित्य संमेलन अमेरिकेत गेल्यानं काय फरक पडणार आहे ? दुसरे पु.ल. होणे नाही, दुसरे कुसुमाग्रज होणे नाही, पण नवे रसरशीत काही निर्माण होणार की नाही ?, असा रोखठोक सवालही त्यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांना इशारा
साहित्य संमेलन अमेरिकेत होणार हे कळताच, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याला पाठिंबाच दिला नाही, तर सढळ हस्ते मदतही केली. हेच औदार्य त्यांनी रत्नागिरीतल्या संमेलनाला दाखवलं नाही तर वाचकांना आवाज उठवावा लागेल, असंही बाळासाहेबांनी ठणकावलं आहे.

No comments: